कांदळगांवात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून येथे काजू कलमांची लागवड.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कांदळगांव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी मालवण यांच्या वतीने श्री.विश्राम तुकाराम राणे यांच्या प्रक्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेअंतर्गत काजू कलमांची लागवड मालवण तहसीलदार श्रीम.वर्षा झालटे, मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली.
श्री.राणे यांच्या ०.२५ हेक्टर क्षेत्रावर ५० काजू कलमांची लागवड करण्यात येणार आहे.यावेळी मंडळ कृषि अधिकारी आचरा श्री.धनंजय गावडे ,मंडळ कृषि अधिकारी पोईप श्री.डि.के.सावंत, श्रीम. पर्यवेक्षक प्रणाली रेडकर, कृषी सहायक श्री. सुनिल कदम , मंडळ अधिकारी कोळंब श्रीम. पिंगुळकर, श्री. निलेश गोसावी आत्मा तंत्रसहाय्यक, कांदळगांव तलाठी, श्रीम. रुद्रा राणे, साटम व शेतकरी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)