आ. नितेश राणे हे 'श्री सद्गुरु आप्पास्वारी तथा आप्पा साहेब धर्माधिकारी' यांच्या मूळ आदेशाचे उल्लंघन करतायत : आमदार वैभव नाईक
आ. नितेश राणे हे चुकिची माहिती पसरवत असल्याचे आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन.
मालवण | सुयोग पंडित : केवळ मतांसाठी राजकारण करण्याकरिता, आमदार नितेश राणे हे सद्गुरु आप्पा साहेब धर्माधिकारी (स्वारी) यांच्या विषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल व आमदार वैभव नाईक यांच्याबद्दल चुकिची माहिती पसरवत असल्याचे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण . सद्गुरु आप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल आणि सर्व सदस्यांबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व पक्षातील सर्वच आमदार यांच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. विधानसभेमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाबाबत उपस्थित प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कोणत्याच आमदारांनी सहभाग घेतला नाही. सदर चर्चेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदारांनी सहभाग घेतला नव्हता आणि याचे रेकॉर्ड देखील विधानसभेत उपलब्ध आहे असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
राजकारण व समाजातील इतर बाह्य वादविवादात सद्गुरु बैठक, सदस्य तसेच सेवेबद्दल कधीच भाष्य करु नये व कोणाचेही नांव घेऊ नये ही सद्गुरु आप्पा साहेब धर्माधिकारी यांची आदेशाची शिकवण आहे आणि महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या याच ‘मूळ आदेशाचे’ उल्लंघन आमदार नितेश राणे करीत आहेत. महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी व सदस्य आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी असून आमदार नितेश राणे हे नेहमीच मतांच्या राजकारणासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. निश्चितच विधानसभेमधील कामकाजाबाबत आमदार नितेश राणे चुकीची माहिती प्रसिद्ध करीत असल्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)