आमदार आदित्य ठाकरे यांचा राज्य व केंद्रावर हुकूमशाहीचा आरोप ; मणिपूर घटना व बि. एम. सी. मध्ये पालकमंत्री लोढा यांच्या कार्यालयाबद्दल व्यक केला संताप.
मुंबई | ब्युरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करुन मणिपूर मधील घटनेची जाहीर निंदा केली आहे. आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जाहीर टीका केली.
मणिपूर मधील घटनेची जाहीर निंदा करताना आमदार आदित्य ठाकरे यांनी मणिपूर सरकारच्या निष्क्रीयतेबद्दल ते बरखास्त केले जावे व तिथे राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असे सांगितले. त्या दुर्देवी घटनेमध्ये कारगील मध्ये लढलेल्या एका सुभेदार जवानीचीही पत्नी अत्याचाराचा बळी ठरली आहे हेही गंभीर आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मणिपूर मधील घटना ही केवळ नाते संबंध किंवा नुसते वाईट वाटायची नसून ती एक भारतीय म्हणून जागतीक स्तरावर मान खाली घालायला लावणारी असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक नागरीकाला संताप व चीड आणणारी ती अमानवी घटना असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार निष्क्रीय असल्यानेच न्यायालयांना तिथे क्रीयाशील व्हावे लागते असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे. मागे एकदा बलात्कारी माणसाचे गुजरातमध्ये स्वागत झाले आहे त्यामुळे निर्लज्जपणा व क्रूरतेबद्दल आपण काय बोलावे हा प्रश्न असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
बी.एम.सी. मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्यांनी ते कार्यालय २४ तासांत बंद करावे अन्यथा मुंबईतून या हुकुमशाही विरुद्ध काही परिणाम झाल्यास कोण जबाबदार असेल त्याचा राज्य सरकारने विचार करावा असे स्पष्ट केले. जर पालकमंत्र्यांना कक्ष असेल तर मुंबईतील आमदारांनाही बी. एम. सी. मध्ये तो कक्ष उपलब्ध असावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)