कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तहसील कार्यालयावर आज संध्याकाळी ४ वाजता काढणार निषेध मोर्चा ; वारकर्यांवरील लाठी हल्ल्याने वातावरण व्यथित.
आ.वैभव नाईक व इतर आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शिवसेना,युवासेना, आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर राज्य सरकारच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला. वारकऱ्यांवर हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरच हल्ला करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसील कार्यालयावर आज सायंकाळी ४ वाजता निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
या मोर्चात शिवसेना,युवासेना, आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)