ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पाडलोस-मडुरा-शेर्ले रस्ता खड्डेमय ; वाहनचालकांची  होतेय तारेवरची कसरत...!

पाडलोस-मडुरा-शेर्ले रस्ता खड्डेमय ; वाहनचालकांची होतेय तारेवरची कसरत...!

प्रकाशन: 19 Oct 2022 10:06 PM
वाचन संख्या 30

बांदा | राकेश परब :
पाडलोस-मडुरा-शेर्ले रस्ता खड्ड्यांनी भरला असून रुग्णांना दवाखान्यात नेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे बुजविण्याच्या मार्गाखाली निधी खर्च होतो परंतु खड्डे काही सुधारत नाहीत. रस्त्यांची परिस्थिती सर्व लोकप्रतिनिधी तसेच नेतेमंडळींना खड्डेमय रस्ता दिसून येत असून सुद्धा दुर्लक्ष केले जाता आहे. त्यामुळे निदान सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पूर्ण मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी केली आहे.
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस-मडुरा-शेर्ले भागात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी वाहने नादुरुस्त होत असून प्रवाशांच्या आजारातही भर पडत आहे. रुग्णांना तर रुग्णालयात नेईपर्यंत खड्ड्यांमुळे वेदना असह्य होतात. अनेकवेळा मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे तर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली केवळ सर्वसामान्य जनतेचा निधीच वाया जात आहे. नेतेमंडळींना रस्ता दुरूस्तीचे नियोजन करण्यास वेळ नाही का, असा सवाल विजय वालावलकर यांनी केला.
निवेदने, आंदोलने करून प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही. रस्त्याची दयनीय अवस्था झाली ही खरी परिस्थिती असताना एवढा वेळ कशाला? त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला कंटाळलेली जनता वेळ आल्यावर तीव्र आंदोलन छेडणार असून नंतर कोणी मध्यस्थी किंवा मोठेपणासाठी येऊ नये असा इशारा मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स