ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भातपीक नुकसानात जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत..!

भातपीक नुकसानात जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत..!

प्रकाशन: 13 Oct 2022 04:25 PM
वाचन संख्या 35

बांदा | राकेश परब : दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरूवात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकलेल्या तथा परिपक्व भाताची कापणी लांबणीवर पडली आहे. पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर कापणीयोग्य झालेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत पडला आहे.

Article image

सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती पिकवली जाते. परंतु सध्याच्या वातावरणातील बदलामुळे व दररोज पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेले भातपीक नुकसानात जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्गामध्ये चिंता पसरली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात भात कापणीला सुरुवात होते. परंतु यावर्षी सध्या लांबलेल्या परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, दांडेली, निगुडे तसेच बांदा परिसरात भाताचे परिपक्व पीक पूर्णपणे कापणीयोग्य झाले असल्याने शेतकरी भात कापणीच्या तयारीत आहे. परंतु दररोज सुरू असलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे भाताच्या तयार झालेल्या लोंबी गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
गवारेड्यांचा उपद्रवामुळे मडुरा पंचक्रोशीत शेकडो एकर जमीन पडीक आहे. त्यात अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास केलेला खर्च तरी भरून निघेल का अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. अजून थोडे दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स