ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राज्यस्तरीय एकता काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राज्यस्तरीय एकता काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर..!

प्रकाशन: 01 Oct 2022 07:11 PM
वाचन संख्या 36

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात
गेली ३४ वर्ष क्षेत्रात योगदान देणाऱ्या एकता कल्चरल अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या ‘गणपत गुणाजी जाधव राज्यस्तरीय काव्य लेखन’ स्पर्धेत
मूळचे तिथवली येथील आणि सध्या सोलापूर येथे कार्यरत असलेले कवी सफर अली इसफ यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय पारितोषिक कलमठ येथील कवी किशोर कदम यांनी प्राप्त केले असल्याची माहिती एकता कल्चरचे अध्यक्ष प्रकाश जाधव,
उपाध्यक्ष उज्जय आंबेकर आणि सचिव प्रकाश पाटील यांनी दिली.

Article image
कवी किशोर कदम .

सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक – सफर अली इसफ – तिथवली- (देशभक्तीचे जोखड खांद्यावर घेत वंशावळ शोधतोय),दुसरा क्रमांक (विभागून) – ईशान संगमनेरकर – कांदिवली-(गोष्ट हरवलेल्या देशाची )- किशोर कदम – कलमठ- (बुजगावणी),तिसरा क्रमांक (विभागून) – सुधाकर कांबळी – कल्याण- (घोट दुःखाचे पिऊनी),सोनाली जाधव -अहिरे – कल्याण (प्रवास)उत्तेजनार्थ पारितोषिक- जगदीश राऊत – नागपूर (आई ),शुभांगी थोटम – नवी मुंबई (मुकरुंदन),रवींद्र जाधव – लांजा – ( फक्त तुझ्यासाठी), मेघा गोळे – महाड – (आहेस कोणत्या तू गावी),संजय भोईर – पालघर (मानसिकता), शरद गाडगीळ मुंबई – (झोपडी), मायकललोपीस – वसई (बाप आमचा आम्हाला कळलाच नाही.)
स्पर्धेत महाराष्ट्रातल्या ७०कवीनी सहभाग घेतला होता.डिसेंबर दरम्यान मुंबई गिरगाव साहित्य संघात होणाऱ्या ३४ व्या एकता संस्कृतिक महोत्सवात विजेत्या कवींना गौरविण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स