ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले मधुन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांनी पाठवली आभारपत्रे!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले मधुन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांनी पाठवली आभारपत्रे!

प्रकाशन: 23 Sep 2022 04:59 PM
वाचन संख्या 51

विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षाच्या आपल्या कार्यकालात सर्व सामान्य जनतेला विवीध योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून दिला. त्यामुळे गोरगरिबांना त्याचा फायदा झाला. अनेक निराधार कुटुंबाना आपल्या हक्काचे घर मिळाले, तर बाहेर शौचास जाणार्याना स्वतःचे शौचालय मिळाले, महिलांना जेवन बनवताना धुरातुन मुक्तता मिळाली व उज्वला योजनेतून मोफत गॅस कनेक्षन मिळाले, कित्येक वर्षे काळोखात रहाणार्या कुटुंबाना सौभाग्य योजनेतून मोफत विज कनेक्षन मिळाले, आरोग्याच्या बाबतीत आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत मदत मिळाली तर शेतकर्यांना शेतकरी सन्मान योजनेतून दर तीन महिन्यांनी खात्यात पैसे जमा होऊ लागले, तसेच कुटुंबाना मोफत धान्य मिळाले. अशा प्रकारे देशातील प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळ्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मदत केली.


अशा लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचे आभार मानले व अशी आभार पत्रे भाजपा कार्यालयात आणुन दिली.
कार्यालयात जमा झालेली पत्रे वेंगुर्लेतील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये नेऊन पत्रपेटीत टाकण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, नगरसेविका श्रेया मयेकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, महिला मोर्चाच्या रसीका मठकर , दुर्वा दिपक माडकर, उद्योजक अंबरीश मांजरेकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, शशिकांत करंगुटकर, बुथप्रमुख रुपेश माडकर, शालिनी सिताराम चिपकर, जितेंद्र जाधव, नेहा पालयेकर, तृप्ती आरोलकर, समृद्धी बांदेकर इत्यादी लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी उज्वला गॅस योजना, पी.एम.स्वनीधी योजना, आरोग्य बीमा योजना, पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, पी.एम.किसान योजना, कल्याण योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स