अठ्ठेचाळीस तासात पर्जन्याचे प्रमाण होणार कमी ; पुणे वेधशाळेचा अंदाज.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सध्या असलेल्या कमी क्षेत्राचा
मध्य प्रदेशजवळ दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव ओसरणार असल्याने राज्यातील पावसाचा जोर पुढील दोन दिवसांत कमी होणार आहे. आज विदर्भातील अनेक भागांत वादळी पाऊस, तर मध्य महाराष्ट्र व कोकणातील अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून ते सध्या मध्य प्रदेश व लगतच्या
भागावर आहे. हे क्षेत्र पुढील
२४ तास पश्चिम व वायव्येकडे सरकणार असून त्यानंतर वळून ते इशान्येकडे व उत्तर प्रदेशकडे मार्गक्रमण करणार आहे. यादरम्यान शुक्रवारच्या आसपास या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे १४ ते १६ सप्टेंबरच्या दरम्यान मुसळधार, तर १७ सप्टेंबरला उत्तराखंड व उत्तरप्रदेशला अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पूर्वोत्तर भारत व देशाच्या बऱ्याचशा भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)