पीएम किसानची 'ई केवायसी' करण्यासाठी शेवटची तारीख जाहीर.
मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली विशेष माहिती
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पीएम किसान लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास पुढचा लाभ मिळणार नाही आहे. तरी या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे. ई केवायसी करण्याची ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत वाढवून ७ सप्टेंबर पर्यत वाढीव मुदत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. इ केवायसी करायला मोबाईल वरून तसेच महा ई सेवा केन्द्र, आपले सरकार केन्द्र, ग्रामपंचायत मध्ये सुविधा उपलब्ध आहे. ज्या लाभार्थी यांनी अद्याप ई केवायसी केलेले नाही. त्यांनी तसेच दुर्गम भागातील शेतकरी यांच्या पर्यंतही याबाबत माहिती पोहोचवून पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी उद्युक्त करावे. असे आवाहन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)