ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>आजगाव साहित्य कट्ट्याच्या सभेत कथाकथन…..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>आजगाव साहित्य कट्ट्याच्या सभेत कथाकथन…..!</em>

प्रकाशन: 25 Jul 2022 12:41 PM
वाचन संख्या 90

विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट :
‘कथा जीवनाला दिशा देणारी हवी, तसेच कथेमधून सकारात्मक विचार दिला गेला पाहिजे’, असे प्रतिपादन सोमा गावडे यानी आपली कथा सांगताना केले. निमित्त होते, आजगावच्या साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या एकविसाव्या सभेचे. आजगाव वाचनालयात झालेल्या या सभेत तीन वक्त्यानी कथाकथन केले.
सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी प्रास्ताविक करून वक्त्यांची ओळख करून दिली आणि उपस्थितांचे स्वागत केले.
त्यानंतर कथाकथनाला सुरुवात झाली. प्रथम विनायक उमर्ये यांनी वि.स.खांडेकर लिखित ‘उःशाप’ ही कथा कथन केली. रामायणाची पार्श्वभूमी लाभलेल्या या कथेने रंगत आणली. क्रौंचवध, पारधी आणि कर्तव्यनिष्ठा यावर आधारित ही कथा श्रोत्यांना कोड्यात टाकून गेली. त्यानंतर सौ.देवयानी आजगावकर यांनी स्थानिक लेखक गोविंद पायनाईक लिखित ‘मठी ‘ ही कथा कथन केली. कोकणच्या भावकीची पार्श्वभूमी लाभलेली ही कथा करुणतेकडे झुकणारी होती. यानंतर लेखक पायनाईक यांनी कथालेखनाची प्रक्रिया समजावून सांगितली. शेवटी सोमा गावडे यांनी स्वतः लिहिलेली ‘आपण सारे कल्पवृक्षातळी’ ही सकारात्मक विचार मांडणारी कथा सांगतली. त्यांची कथन शैली सर्वांना आवडली.
कथाकथनानंतर कट्ट्याच्या सदस्यानी चर्चा केली. त्या चर्चेची सुरुवात ईश्वर थडके यांनी केली तर अनिल निखार्गे यांनी मठी कथेच्या अनुरोधाने कोकणाच्या समाजजीवना संबंधी विचार मांडले. मीरा आपटे, डाॅ. मधुकर घारपुरे आणि शंकर प्रभू यांनीही चर्चेत भाग घेतला. विनय सौदागर यांनी आभार मानले.
सभेला अण्णा झाटये, प्रिया आजगावकर, सरोज रेडकर, रश्मी आजगावकर, एकनाथ शेटकर, अंकुश आजगावकर, अनिता सौदागर आणि चंद्रकांत गवंडे आदी साहित्य प्रेमी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स