केंद्रीय मंत्री नाम.नारायण राणे यांना जामीन मंजूर
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी झाली होती अटक
कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण
महाड | ब्यूरो न्यूज: जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर बोलताना नाम.नारायण राणे यांच्याकडून झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना अटक झाली होती.
महाराष्ट्रामध्ये एखाद्या केंद्रीय मत्र्यांना नाट्यमयरित्या अटक होण्याची ही दुर्मिळ घटना होती.
राज्यातील विविध जिल्ह्यात दिवसभरात या घटनेचे परस्परविरोधी पडसाद उमटत होते.
जवळपास नऊ तासांच्या विविध घडामोडींनंतर रात्री उशिरा महाड कोर्टाने नाम.नारायण राणे यांना जामीन मंजूर केला.
भाजप कार्यकर्त्यांच्या गोटामधून हा एक नैतिक विजयच असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी नाशिक व पुणे येथील पोलिस नाम.नारायण राणे यांचा ताबा घ्यायची शक्यता बोलली जात होती परंतु तसा ताबा घेतला जाणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे. जन आशीर्वाद यात्रेचे आता काय होणार हेही कार्यकर्त्यांना कुतुहल आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)