<em>रविकिरण तोरसकर संतापले…!</em>
मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना टोल आकारून दाखवा..!
टोल आंदोलनाचे नेतृत्व मच्छीमार करणार.
राजकीय पक्षांनी नौटंकी थांबवावी…!
मालवण | सुयोग पंडित:
व्यवसाय करणारा मग तो कृषि,मत्स्य,वाहतूक,व्यापारी,पर्यटन अथवा कुक्कुटपालन व्यवसाय करणारा असेल आधीच मेटाकुटीला आला आहे.आत्ता त्यात भर म्हणून हे टोल संकट.हे टोल संकट नसून प्रतिथयश सर्वपक्षीय राजकारणी आणि टोल कंत्राटदार यांनी मिळून आखलेला कोकणातील जनतेला लुटण्यासाठी केलेला पूर्व नियोजित प्लॅन आहे.महामार्ग बांधणीच्या वेळी कंत्राटदार आणि राजकीय पुढारी यांच्या दिले घेतलेल्या उपकारांची परतफेड जनतेच्या पैशातून करण्यासाठी ही टोल धाड आहे.ही टोळ धाड बंद करण्यासाठी कोल्हापूर स्टाईलने आंदोलन करणे गरजेचे आहे.ज्याप्रमाणे कोल्हापूर मध्ये टोल वसुली बंद पाडली त्याचप्रमाणे मच्छीमार संघटना एकत्र येऊन काम करणार आहेत.त्याप्रमाणे संघटने मध्ये चर्चा सुरू असून लवकरच या संदर्भात जिल्ह्यातील सर्व संघटनाच्या बैठकीच नियोजन करण्यात येणार आहे.टोल माफ़ी संदर्भातील शासनस्तरावर झालेल्या पत्रव्यवहार जाहीर करावा ही विनंती राजकिय पक्षाच्या प्रतिनिधी यांना प्रसिद्धी पत्रका द्वारे करित आहे.
असे रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी जाहीर केले (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ,नॅशनल फिश वर्कर्स फोरम)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)