ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुंबई जिल्हा कबड्डी ज्युनिअर संघात मुळ चिंदर येथील अथर्व अपराज याची निवड.

मुंबई जिल्हा कबड्डी ज्युनिअर संघात मुळ चिंदर येथील अथर्व अपराज याची निवड.

प्रकाशन: 06 Dec 2021 09:41 PM
वाचन संख्या 214

आचरा /विवेक परब : चिंदर कोंडवाडी येथील मुंबईस्थित राहिवासी लवू सीताराम अपराज यांचा “अथर्व लवू अपराज” : : याची कबड्डी या खेळ प्रकारात मुबंई जिल्हा संघात निवड झाली आहे. अथर्व महाराष्ट्र हायस्कूलचा इयत्ता ९ वी चा विद्यार्थी आहे. तसा कबड्डी ह्या खेळ प्रकारात खूप जास्त शारीरिक ताकद आणि मानसिक स्वास्थ टिकविणे गरजेचे आहे. प्रतिस्पर्धी काय दमाचा आहे हे त्यांच्याशी दोन हात केल्याशिवाय कळणे केव्हाही अशक्यच.कबड्डी हा सांघिक खेळ आहे. सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो, खेळाचा उद्देश एकच खेळाडू ने विरुद्ध संघाच्या कोर्टात प्रवेश करायचा आहे, ज्याला “रेडर” म्हणून संबोधले जाते, विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेणे, शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करणे आणि सर्व बचावकर्त्यांद्वारे हाताळल्याशिवाय आणि एका दमात, कोर्टाच्या अर्ध्या भागाकडे परत जातात. रेडरने टॅग केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळवले जातात, तर विरोधी संघ रेडरला थांबवल्याबद्दल एक गुण मिळवतो. खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा हाताळले गेल्यास खेळातून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या संघाने टॅग किंवा टॅकलमधून मिळालेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.नवीन पिढी या खेळात अजूनही रस घेतेय. मोबाईल विश्व् दूर सारत असच दरमजल करावी ही प्रामाणिक इच्छा आणि महत्त्वकांशा अथर्व सारख्या खेळाडूंमध्ये दिसते. अथर्वच्या या यशा बद्दल त्याच्यामुळ गावी त्याचे कौतुक केले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स