राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील सहभागासाठी आवाहन.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील सहभागासाठी आवाहन.
स्पर्धेसाठी, 'हाकला भोंदू - सुखाने नांदू', ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना - कल्याणकारी की रेवडी, चित्ती असू द्यावे समाधान' असे निबंधाचे विषय.
मसुरे | प्रतिनिधी : विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
'हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना: कल्याणकारी की रेवडी, चित्ती असू द्यावे समाधान' असे या निबंध स्पर्धेचे विषय आहेत.
निबंधाची शब्द मर्यादा १,५०० असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार निबंधरूपाने लिहून त्यावर नाव, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा अशी माहिती देण्यात आली आहे. टंकलिखित किंवा सुवाच्च अक्षरातील निबंध संस्थेच्या ११९, आनंद इस्टेट, दुसरा मजला,साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (प) मुंबई - ४०००११ या पत्त्यावर पाठवावेत किंवा निबंधाची एक स्कॅन कॉपी पीडीएफ स्वरुपात संस्थेच्या vumm1954@gmail.com या ई-मेल आयडीवर ९ जुलै पूर्वी पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
इमेल मधील विषयात खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२६ असे नमूद करावे अशी माहिती मिळत आहे.
निबंध स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.२००१, द्वितीय पारितोषिक रु.१५०१ आणि तृतीय पारितोषिक १००१ आणि प्रमाणपत्र आहे. २७ जून रोजी काव्यवाचन स्पर्धा तसेच ११ जुलै रोजी खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी २८ जून रोजी ५ वी ते १० वी साठी मराठी हस्ताक्षर स्पर्धा, १ ली ते १० साठी चित्रकला स्पर्धा, तसेच ५ जुलै रोजी १ ली ४ थी साठी पाठांतर स्पर्धा तसेच ५ वी ते १० वी व महाविद्यालयीन मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. वरील सर्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असणार आहेत. अधिक माहितीसाठी संकेत शिर्के ७०३९८८८५६२, हार्दिक सकपाळ ९३७२६०८६८७ संपर्क साधावा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल
श्री. शिवाजी वाचन मंदिरात कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण.