अदिती भालचंद्र पुजारे हिचे आयसीएसई बोर्डमधून दहावी परीक्षेत सुयश.
अदिती भालचंद्र पुजारे हिचे आयसीएसई बोर्डमधून दहावीच्या परीक्षेत सुयश.
मुंबईस्थित पळसंबच्या कन्येचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी गावाच्या वतीने केले अभिनंदन.
मालवण : मुंबईतल्या कांदिवली ( पूर्व ) येथील 'चिल्ड्रन्स ॲकॅडमी' प्रशालेची विद्यार्थिनी कु. अदिती काश्मिरा भालचंद्र पुजारे हिने २०२५/२०२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. मालवण तालुक्यातील मूळ पळसंब गावातील मुंबईस्थित ग्रामस्थ उद्योजक भालचंद्र उर्फ बाबू पुजारे व डाॅ. काश्मिरा पुजारे यांची कन्या कु. अदिती भालचंद्र पुजारे हिने आयसीएसई (ICSE) बोर्डमधून दहावीच्या परीक्षेत ९२% गुण प्राप्त केले.
अदिती पुजारे हिने तिच्या यशात, 'चिल्ड्रन्स अकॅडमी,' कांदिवली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा दिनेश व शीला मल्ल्या, वर्गशिक्षिका सुधासेन गुप्ता, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि तिच्या आई - वडिलांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले आहे.
बाल लेखिका म्हणून सुपरिचित असलेली कु. अदिती पुजारे हिने गावाला अभिमान वाटेल असे गुण मिळवले आहेत असे नमूद करुन, तिच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी श्री. जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब व पळसंब गावच्या वतीने सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी एका संदेशाद्वारे तिचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
डॉ. शिल्पा झांटये यांच्या 'द गारलँड ऑफ वर्ड्स' काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.