ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांना 'सत्यमेव जयते फार्मर कप' मध्ये सहभागी होण्याची संधी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांना 'सत्यमेव जयते फार्मर कप' मध्ये सहभागी होण्याची संधी.

मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रथमच 'सत्यमेव जयते फार्मर कप' मध्ये सहभागी होण्याची संधी.


कट्टा येथील कार्यशाळेच्या आयोजनाची कृषी अधिकाऱ्यांची माहिती. 

Article image

पानी फाऊंडेशनचे प्रतिनिधी सविस्तर माहिती देणार.


 मसुरे | प्रतिनिधी : 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' ची माहिती मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी एक दिवसीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ओम गणेश साई मंगल कार्यालय, कट्टा येथे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ही कार्यशाळा संपन्न होईल. 


यामध्ये पाणी फाउंडेशन चे प्रतिनिधी शेतकऱ्यांना, 'सत्यमेव जयते वॉटर कप' बाबत सविस्तर माहिती देणार आहे. या कार्यशाळेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी आपल्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील व तालुका कृषी अधिकारी मालवण अमोल करंदीकर यांनी केले आहे.


महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये पिण्यासाठी त्याचबरोबर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांना मदत म्हणून अनेक अशासकीय संस्था पुढे आल्या. अभिनेते अमीर खान यांची पाणी फाउंडेशन ही संस्था त्यापैकीच एक अग्रगण्य नाव. सन २०१६ पासून सुरुवात करून सुरुवातीस केवळ तीन गावांमध्ये वॉटर कप ही स्पर्धा घेण्यात आली. आता २०२४ नंतर हे काम जवळपास २४, ५०० ( चोवीस हजार पाचशे) गावांपर्यंत पोहोचले आहे अशी माहिती मिळत आहे परंतु त्यात कोकण विभागाचा समावेश नव्हता...!


मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेवरून पाणी फाउंडेशन ने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामविकास विभाग यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये २०२६ पासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये आता कोकणातील शेतकरी गट सुद्धा सहभागी होऊ शकणार आहे. शासनाच्या विविध योजना राबविण्या बरोबरच श्रमदान हा सुद्धा महत्त्वाचा घटक यामध्ये ठेवण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने प्रधान सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे. 


शेतकऱ्यांचे संघटन करणे तसेच त्यांना उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था याने विकसित केलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी उद्युक्त करणे, हवामान अनुकूल शेती पद्धतीसाठी प्रशिक्षण देणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा वापर वाढविणे अशी अनेक उद्दिष्टे या फार्मर कप स्पर्धेमध्ये ठेवण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स