तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र ग्रामीण स्तरावर हलवण्याची मागणी.
मालवण तालुक्यातील स्वयंचलित
हवामान केंद्र ग्रामीण स्तरावर हलवण्याची मागणी.
पालकमंत्री नितेश राणे यांना
तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिले निवेदन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. याबाबत भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन दिले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासमवेत तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, राजू परुळेकर, विजय निकम, महेंद्र चव्हाण उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केद्रात नोंदवले जात नाहीत. सन २०२२ - २३ मध्ये महावेद प्रकल्प अंतर्गत वेंगुर्ला तहसील कार्यालयासमोर असलेले स्वयंचलित हवामान केंद्र बदलून कुशेवाडा येथे नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे जेणेकरून ग्रामीण स्तरावरील सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळू शकेल, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मंत्री नितेश राणे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब कार्यक्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांसाठी 'फार्मर आयडी शिबिर' संपन्न.
पळसंब कार्यक्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांसा...
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...