नापणे धबधब्यावर काचेच्या पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.
सिंधुरत्न योजनेतून राज्यातील पहिला काचेचा पूल.
वैभववाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्गातील नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवार, २२ जुलै रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

या पुलामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. येत्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारुपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची काळजी देखील घ्यावी, असे आवाहन यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, अरविंद रावराणे, नापणे सरपंच प्रदीप जैतापकर, नाधवडे सरपंच लीना पांचाळ, शेर्पे सरपंच सौ. पांचाळ, प्राची तावडे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बंड्या मांजरेकर, बाळा जठार, कार्यकारी अभियंता श्रीमती विना पुजारी, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, माजी कार्यकारी अभियंता सर्वगोड, कनिष्ठ अभियंता शुभम दुडीये, ठेकेदार शशिकांत उर्फ राजू मुणगेकर, गणेश हळदीवे, ॲड.उमेश सावंत व पदाधिकारी, ग्रामस्थ, पर्यटक आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)