भूतनाथ वायरी, चिंदर व आचरा ग्रामपंचायतीसाठी कायमस्वरूपी ग्राम अधिकाऱ्यांची मागणी.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीसह चिंदर व आचरा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्राम अधिकारी मिळावा, अशी मागणी मंगळवार, २४ जून रोजी वायरी भूतनाथ, चिंदर व आचरा विभागातील काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. वायरी भूतनाथ, आचरा, चिंदर येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि वायरी ग्रामपंचायत माजी सरपंच देवानंद लुडबे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुका सरचिटणीस तथा चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगावकर, युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पल्लवी तारी – खानोलकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, विठ्ठल तळवडेकर, पराग माणगावकर, दिलीप तळगावकर, चव्हाण यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत तत्परतेने लक्ष घालून येत्या काही दिवसात कायमस्वरूपी ग्राम अधिकारी देणार असल्याचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)