रेल्वे प्रवाशांच्या हिताला प्राधान्य आवश्यक.
दादर येथे श्रीकांत सावंत यांनी विविध रेल्वे समस्यांबाबत वेधले लक्ष.
मुंब्रा रेल्वे दुर्घटना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मानवता विकास परीषदच्या वतीने दिली प्रतिक्रिया.
मुंबई | ब्यूरो न्यूज : रेल्वेबाबतीतील निर्णय हे प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देणारे असण्याची आवश्यकता आहे असे, मानवता विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी दादर येथे माध्यमांशी झालेल्या संवादानंतर व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघाचे कार्यकर्ते व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मुंब्रा रेल्वे दुर्घटने बाबत व एकूणच भारतीय रेल्वे व कोकण रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, त्रासदायक प्रवास याबाबत दादर येथे प्रतिक्रिया दिली. यावेळी, मोठ्या संख्येने रेल्वे प्रवाशी उपस्थित होते.
या दरम्यान त्यांनी, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण, दुपदरीकरण, रेल्वे टर्मिनस त्वरित पूर्ण करणे हे मुद्दे देखिल प्रवाशांसह मांडले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)