मालवणात ऑपरेशन सिंदूर बद्दल वायूसेना व सरकारचे अभिनंदन.
भरड नाका येथे फटाक्यांसह जल्लोष.
मालवण | ब्यूरो न्यूज : भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील दहशतवादी ९ तळ उध्वस्त केले व अनेक आतंक्यांना कंठस्नान घातले. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाकिस्तानला सडेतोड आहे.
याबद्दल मालवणात भारतीय वायू सेना व भारत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत फटाक्यांसह जल्लोष करण्यात आला.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, स्वयंसेवक संघ आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने मालवण भरड नाका येथे फटाके फोडून आणि ‘याचना नही अब रण होगा…संघर्ष बडा भीषण होगा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी नागरीक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)