ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मलमपट्टी नको… पक्का बंधारा हवा…!

मलमपट्टी नको… पक्का बंधारा हवा…!

प्रकाशन: 20 Sep 2024 08:40 PM
वाचन संख्या 105

देवबागचे ग्रामपंचायतचे माजी बांधकाम सभापती हालेस डिसोजा यांनी जिल्हा नियोजन निधीतून धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातले ‘पर्यटन गांव’ म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या देवबागला सागरी अतिक्रमणाचा धोका गेली अनेक वर्षे असून यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देवबाग किनाऱ्यावर वेंगुर्ला व चिवला बीच, मालवण प्रमाणे संरक्षक धूप प्रतिबंधक बंधारा होणे आवश्यक आहे, देवबाग येथे धूपप्रतिबंधक बंधारा होण्यासाठी जिल्हा नियोजन निधी मधून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी देवबाग ग्रामपंचायतीचे माजी बांधकाम सभापती हालेस डिसोजा यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देवबागमध्ये पर्यटन दृष्ट्या अद्याप पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. पावसाळ्याच्या चार महिन्यात देवबाग किनारपट्टीला समुद्राच्या उधाणाचा, लाटांचा मारा सहन करावा लागतो. यामुळे देवबाग किनारी वसलेल्या ७५ % घरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. शासनाकडून पाच ते सहा वर्षांनी काही प्रमाणात किनाऱ्यावर मलमपट्टी केली जाते. मात्र या नैसर्गिक आपत्ती पासून कायमस्वरूपी संरक्षण होणे गरजेचे असून त्यासाठी मजबूत व पक्का संरक्षक धूपप्रतिबंधक बंधारा होणे आवश्यक आहे. मात्र तो अद्याप पर्यंत झालेला नाही. या ठिकाणी यापूर्वी बंधारा बांधण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यासाठी वापरलेला काळा दगड हा कमी वजनाचा असल्याने तो लाटांमुळे विखुरला गेला आहे. या ठिकाणी पक्का बंधारा झाल्यास तो चिरकाळ टिकेल. जीवितहानी टाळण्यासाठी व देवबागचे अस्तित्व टिकविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष घालून देवबाग किनाऱ्यावर संरक्षक धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी नियोजन करावे, बंधाऱ्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी हालेस डिसोजा यांनी निवेदनातून केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स