तुमचा नसेल टाॅवर तर आमची संपणार पाॅवर ; साळशी ग्रामस्थांनी दिला इशारा..!
शिरगांव | संतोष साळसकर ( उप संपादक) :
देवगड तालुक्यातील साळशी येथील मोबाईल सेवा वारंवार बिघाड होऊन खंडीत होत आहे. ०२ ऑगस्ट पासून या सेवेत व्यत्यय येत असून सध्या ती पूर्णपणे बंद पड़ली आहे.
याठीकाणी संपर्कासाठी दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थीतीत रात्री-अपरात्री गावापासून नजिकच्या सहा किमी अंतरावर जाऊन शहराकडे संपर्क करून मदत घ्यावी लागते. अशा प्रकारच्या बेभरवशी सेवेमुळे ग्राहकांची फारच मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. शासकीय, कामे यासाठी इंटरनेट सेवा आवश्यक असते. या सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. याचबरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत असून या सर्व प्रतिकुल परिस्थीतीचा ग्राहकांना सामना करावा लागत आहे . याबाबत योग्य ती कार्यवाही करून सेवा सुरळीत करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव जनआंदोलन वेगवे लागेल असा इशारा मोबाईल ग्राहकांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)