सोनारवाडी ( कट्टा - पेंडूर ) येथील राजेंद्र आकेरकर यांचे मुंबईत निधन.
तेली सेवा समाज मुंबई, संस्थेचे माजी सचिव श्री. प्रदिप सत्यवान आकेरकर यांचे कनिष्ठ बंधू होत.
शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कट्टा पेंडुर – सोनारवाडी येथील रहिवासी राजेंद्र सत्यवान आकेरकर (६२ वर्षे ) यांचे बुधवारी२९ मे रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, भावजय, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.
तेली सेवा समाज मुंबई या संस्थेचे माजी सचिव श्री. प्रदिप सत्यवान आकेरकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)