ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाताला बोनस हवाच ; आमदार वैभव नाईक यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत उठवला आवाज..!

भाताला बोनस हवाच ; आमदार वैभव नाईक यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत उठवला आवाज..!

प्रकाशन: 13 Dec 2023 11:07 PM
वाचन संख्या 128

आमदार राजन साळवी, आमदार रवींद्र वायकर, आमदार ऋतूजा लटके यांच्या समवेत मांडला प्रश्न.

मुंबई | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेती करतात. शासनाकडून भात खरेदीवर क्विंटलमागे २१६५ रु दर दिला जाणार आहे. मात्र गेल्या वर्षी शेतकऱ्यांना भातखरेदीवर बोनस देण्यात आलेला नाही. यावर्षी देखील बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. आता भात खरेदी सुरू झाली असून लवकरात लवकर बोनसची रक्कम हवीच अशी मागणी आज आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली.

भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस मिळावा यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आमदार राजन साळवी, आमदार रवींद्र वायकर, आमदार ऋतूजा लटके यांच्या समवेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले. यावेळी भाताला बोनस मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. भात पिकाला चांगला दर मिळावा यासाठी आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात वारंवार आवाज उठविला आहे. त्याचबरोबर भात खरेदीवर बोनस रक्कम मिळण्यासाठी देखील ते पाठपुरावा करीत आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी भात खरेदीवर क्विंटल मागे ५०० रु बोनस रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी बोनसची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून यावर्षी बोनस रक्कम मिळण्याची मागणी होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स