हरी मुखें म्हणा…!
सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणची आस्था आणि किल्ले सिंधुदुर्गला जिथून प्रेरणादृष्टी मिळाले असे स्थान म्हणजे श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा. आज २५ नोव्हेंबरला सकाळी मोरयाचा धोंडा शासकीय पूजा पालकमंत्री व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
मालवण वासियांसाठी ‘मोरयाचा धोंडा’ म्हणजे आई वडिलांच्याच श्रेणीत असतो व राहीलच.
आज एक राजकीय परंपरेला छेद देणारा व कुठल्याही प्रकारे राजकारणाचा डाऊन करत त्याच सोहळ्याला त्याच चंदेरी मातीचा सुपुत्र तिथे जातीने हजर होता हे पाहून समस्त छत्रपतींच्या श्वासांचे बळ वाढले.माजी जि प सदस्य हरी खोबरेकर..कुठल्याही पक्षाचा अंखरखा न घालता फक्त छत्रपती शिवाजी महाराज व सोहळ्याला नमन करायला कुठलाही लवाजमा न घेता आले होते..!
सोहळ्याला जिल्ह्यातील नामवंत होतेच परंतु हरी खोबरेकर यांचा ‘समुद्र साधेपणा’ आता चर्चेचा विषय आहे. ‘हरी मुखें म्हणा’ ही सर्वसमावेशक श्री ज्ञानेश्वरी उक्ती नकळत हरी यांनी राजकीय भेदाभेद न करता सिद्ध केली…कारण त्याच उक्तीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ” पुण्याची गणना..कोण करी..!”
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)