ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा ; तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा ; तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन

प्रकाशन: 21 Oct 2023 01:58 PM
वाचन संख्या 153

मसुरे | प्रतिनिधी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. आंबिया बहार मध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येत आहे यासाठी शेतकरी सहभाग करिता विमा पोर्टल सुरू झाले असून कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करावे असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.

कोकण विभागामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू व केळी पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल (आंबा व काजू ५ वर्षे).कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छीक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळ पिकासाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. एका फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैंकी कोणत्याही एकाच बहाराकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी पिकाकरिता ३१ ऑक्टोबर २०२३ आंबा व काजू पिकाकरिता ३० नोव्हेंबर २०२३ अशी आहे आंबा पिकाकरिता प्रती हेक्टरी विमा हप्ता ७०००/- व काजू पिकाकरिता प्रती हेक्टरी ५०००/- याप्रमाणे आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स