विरोधकांना आमदार नितेश राणे यांच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ; वैभववाडीचा विकास फक्त आमदार नितेश राणे यांच्या मुळे : भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे.
सत्तेत असताना शिवसेनेने उबाठा गटाने एक केलेले विधायक काम दाखवावे असे केले आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सध्या वैभववाडी चालू असलेल्या ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न’ अभियाना मधून आमदार नितेश राणे यांच्यावरती टीका करण्यात येत आहे, यावर वैभववाडी तालुक्याचे रहिवासी व भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी प्रसिद्ध पत्रकद्वारे शिवसेना उबाठावरती जोरदार पलटवार केला आहे. शिवसेना उबाठा पुढाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांनी काय केले हे पाहायचे असेल तर सध्या होऊ दे चर्चा ह्या चालू असलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून थोडे मागे वळून पाहावे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना आपण घेत असलेला कार्यक्रम हा आमदार नितेश राणे साहेब यांच्या प्रयत्नातून विकसित केलेल्या सेल्फी पॉइंट वरच आहे हे लक्षात येईल. राज्यात साडेसात वर्ष शिवसेना(उबाठा) सत्तेत होती, केंद्रात पाच वर्ष शिवसेना(उबाठा) सत्तेत होती. मग तुम्ही सत्तेत होता तेव्हा का नाही आठवली युवकांची बेरोजगारी, का नाही पेट्रोल डिझेल दरात कपात, का नाही दिले धनगर समाजाला आरक्षण, का नाही दिले मराठा समाजाला आरक्षण, का नाही छत्रपती शिव स्मारक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवसेना उ.बा.ठा सत्तेत असताना अनेक अनैतिक घटना देखील घडल्या त्याबाबत देखील होऊदे चर्चा मध्ये चर्चा कराव्यात असे नवलराज काळे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
कोरोना काळात तुमची सत्ता असताना जिल्ह्यातील शिवसेना उबाठा पदाधिकारी जनतेचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहत होते त्यावेळी आमदार नितेश राणे जनतेसाठी कोरोना रुग्णांसाठी, कोरोना वर उपचार करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स,नर्स सर्व कर्मचाऱ्यांसाठी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य रोग नियंत्रण ग्राम कमिटी साठी अनेक प्रकारच्या मदती करून देवदूत म्हणून काम करत होते त्यावेळी शिवसेना उबाठा पदाधिकारी कुठल्या बिळात लपले होते याचे उत्तर होऊ द्या चर्चा या कार्यक्रमातून जनतेला मिळू देत असे नवलराज काळे यांनी आवाहन केले आहे.
जेव्हा आमदार नितेश राणे विरोधी आमदार तेव्हा जेवढी कामे आमदार नितेश राणे यांनी केली तेवढी तरी शिवसेनेने (उ.बा.ठा.) सत्तेत असताना केली का याचे उत्तर शिवसेना (उ.बा.ठा.)पदाधिकारी यांनी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात जनतेला द्यावी. आमदार नितेश राणे यांनी काय केले काय नाही केले हे जनतेला आहे ठाऊक शिवसेना उ.बा.ठा. ला जनता मतपेटीतून उत्तर देईल यातील मात्र शंका नाही. निवडणुकीपूर्ती आपली दुकाने उघडणाऱ्या नौटंकीबाज शिवसेना उबाठा नेत्यांना जनता जागा दाखवेल असा काळे यांनी व्यक्त केला विश्वास
वैभववाडी तालुक्यात विविध ठिकाणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ जनतेला मिळत आहे तालुक्यातील नेटवर्क चा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्य यंत्रणेचे प्रश्न असतील अशा सर्व समावेश असलेल्या विकास कामांना आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सत्ताधारी आमदार या नात्याने योग्य न्याय मिळत व यापुढेही योग्य भूमिकेतून जनतेला न्यायदेण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ता कटिबद्ध आहे.
खरं तर होऊ दे चर्चा हा कार्यक्रम फक्त शिवसेना उ.बा.ठा. कार्यकर्त्यांपुरतीत मर्यादित होता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला कार्यक्रमात बोलण्याची संधी नव्हतीच. सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारण्याची संधी देत खुली चर्चा ठेवल्यास स्वतःची नाचक्की होईल याची शिवसेना उबाठा गटाला खात्री होती, त्यामुळे होऊ दे चर्चा आपल्या कार्यकर्त्यां सोबत घेऊन आपली राजकीय पोळी भाजू इच्छिणाऱ्या शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांची राजकीय पोळी भाजली जाणार नाही असा टोला भाजप युवा नेते सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी नवलराज विजयसिंह काळे यांनी शिवसेना उ.बा.ठा. गटावर लगावला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)