चिंदर येथील उद्योजक व समाज कार्यकर्ते सुरेश ऊर्फ बाबू वळंजू कालवश.
शिवसेनेच्या खडतर काळात खंबीर योगदान देणारे शिवसैनिक म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व हरपले ; आचरा विभागावर शोककळा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथील उद्योजक व समाज कार्यकर्ते सुरेश ऊर्फ बाबू वळंजू यांचे काल रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. आज सकाळी चिंदर नागोचीवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या कै. सुरेश ऊर्फ बाबू वळंजू हे शिवसेनेच्या कठीण काळात वेळोवेळी खंबीरपणे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले शिवसैनिक म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. आचरा पंचक्रोशीतील ते एक नावाजलेले काजू व्यापारी होते. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना चिंदर गांवातील व परिसरातील संघटना बांधणीसाठी त्यांचे सहकार्य उल्लेखनीय असे असल्याने मालवण तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या मनात त्यांचे एक आदराचे व वेगळे स्थान होते. त्यांच्या निधनाने आचरा विभागातून शोक व्यक्त होत आहे.
कै.सुरेश वळंजू यांच्या पश्चात भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी व कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)