आरोस येथे काजु बागायतीला भीषण आग
बांदा /राकेश परब : सध्या कोकणातील काजू हंगाम सुरू असताना आरोस कळगुंटकर वाडी येथे काजू बागायतीला भीषण आग लागली.एकूण वीस हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आगीत जळून खाक झाले. सदर शेतकऱ्यांचे नूकसानी कोटीच्या घरात झाली आहे. ऐन काजू हंगामात काजू बागेला आग लागण्याचे प्रकार वाढत आहे.आरोस कळगुंटकर वाडी येथे ऐन काजू हंगामात काजू बागेला भरदुपारी आग लागली. आग भरदुपारची लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे वुत्त कळताच आग विझवण्यासाठी ग्रामस्थानी धाव घेतली. आग विझवण्याचे ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. वीस हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडल्याने नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला.
आगीमध्ये गुंडू कळगुंटकर, शेखर कळगुंकर, सिताबाई कासले या शेतक-यांची मोठी नुकसानी झाली. घटनास्थळाचा तलाठी, व कुषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर पंचनामा केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)