ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाफोली पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ न केल्यास सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांचे बेमुदत आंदोलन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वाफोली पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ न केल्यास सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांचे बेमुदत आंदोलन

प्रकाशन: 25 Feb 2023 02:54 PM
वाचन संख्या 38

बांदा /राकेश परब : बांदा आंबोली मार्गावरील वाफोली धरणा नजीक पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ सुरु करावे अशी मागणी  सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्य‍ाकडे वाफोली गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी केली आहे.संबधित ठेकेदारांकडून आठ दिवसांत काम सुरु न  केल्यास ८ मार्च रोजी वाफोली धरण जवळील  पुलावर बसून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा आईर यांनी दिला आहे. बांदा  आंबोली मार्गावर वाफोली धरणानजीक पुलाचे काम नाबार्ड योजनेअंतर्गत सुमारे ७५ लाख खर्च करुन काम गेल्या मार्च अखरीस पुर्ण झाले असले तरी  पुलाच्या दोन्ही बाजूने मजबुतीकरण व डांबरीकरण रस्ता अपूर्ण आहे. रस्ता पुर्णत: पणे खड्डेमय झालेला आहे. वाहनचालकास मोठी कसरत करावी लागत आहे.गतवर्षी पावसाळ्यात चिखलाचे सामाज्र पसरल्याने अपघात झाले होते.  सद्या फेब्रुवारी अखरीस रस्ता पुर्णत: खड्डेमय व धुळीमुळे  वाहन धारकांना वाहने चालविताना नाहक त्रास होत आहे. अशा परिस्थीतीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णत जबाबदार आहे. असे आईर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.   

    कोल्हापुर पुणे गोवा येथे जाणारे  पर्यटक जवळचा मार्ग असल्याने  ये जा करत असल्याने  मार्गावर  मोठ्या संख्येने गाड्यांची रेलचेल असते. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स