"धन्यवाद मोदीजी" पत्र लेखन अभियानाचा आज मालवण मधून किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ....
शेत बांधावर जावून शेतकऱ्यांशी साधला संवाद
ब्यूरो चिफ / विवेक परब : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या “किसान सन्मान निधी” योजनेला आज चार वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यांमधील या योजनेच्या लाभार्त्यांशी संवाद साधून त्या शेतकऱ्यांकडून मोदीजींचे आभार पत्र घेऊन ते पंतप्रधानांना पाठविण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. आज भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी मालवण मध्ये यांचा शेती बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व किसान सन्मान निधीचा लाभा बद्दल पंप्रधान मोदीजींना धन्यवाद देण्यासाठी आभार पत्र घेण्यात आली.
यावेळी भाजप किसान तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, शेतकरी राजू आंबेरकर, हरिभाऊ केळूसकर, अनिल मुणगेकर, संदीप गांवकर, रेश्मा गांवकर, गणेश परब, चंद्रकांत परूळेकर, लिला मयेकर, मयूर परब उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)