ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गोळवण गावासाठी कायमस्वरूपी तलाठी आवश्यक अन्यथा आंदोलन; सरपंच सुभाष लाड यांचा इशारा.

गोळवण गावासाठी कायमस्वरूपी तलाठी आवश्यक अन्यथा आंदोलन; सरपंच सुभाष लाड यांचा इशारा.

प्रकाशन: 11 Dec 2022 01:41 PM
वाचन संख्या 46

मालवण तहसीलदारांना दिले निवेदन.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या गोळवण- कुमामे- डिकवल ग्रामपंचायतीमध्ये गोळवण, कुमामे, डिकवल अशा तीन महसुली गावांचा सामावेश असून या तीन गावांचे गोळवण येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय आहे. गेले वर्षभर हे कार्यालय तलाठ्याविना बंद आहे. गोळवण तलाठी पदाचा कार्यभार कट्टा तलाठ्यांकडे असून विविध दाखले व कामांसाठी कट्टा येथे जाणे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. यामुळे अनेक महसुली कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे ग्रामस्थ व शेतकरी यांच्यातून संताप व्यक्त होत असून गोळवण साठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्ती करावा अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन छेडले जाईल असा इशारा गोळवण- कुमामे -डिकवल ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष लाड यांनी मालवण तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.

गोळवण तलाठी सजाची जबाबदारी कट्टा येथील तलाठी यांच्याकडे दिलेली आहे. गोळवण- डिकवल हे अंतर सुमारे १० कि. मी. पेक्षा जास्त असून गोळवण- कुमामे-डिकवल हे तीनही गाव डोंगराळ आहेत. त्यामुळे सातबारा व अन्य दाखल्यांच्या कामासाठी कट्टा येथे जाणे फार त्रासाचे होत आहे. गोरगरीब पेन्शनधारकांचे उत्पनाचे दाखले, शाळेतील मुलांच्या उत्पनाचे दाखल्यांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कट्टा येथील तलाठ्यांकडे अन्य गावांचा पदभार असल्यामुळे तेथे गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना तलाठी उपलब्ध होत नाहीत. गावातील असंख्य शेतकऱ्यांची वारस तपास कामे, हक्क सोड कामे गेली २ ते ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गावातील शेतकरी मेटाकुटीस आलेला असून त्यांचा राग ग्रामपंचायतीवर काढत आहेत. यातून गावातील ग्रामसभा, मासिक सभा वादळी होऊन ग्रामस्थ सभेमध्ये हगांमा करीत आहेत. तलाठी अभावी शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासूनही वंचित राहावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट निर्माण झालेली आहे, असे सुभाष लाड यांनी निवेदनात म्हटले आहे.
गोळवण तलाठी ऑफिस अनेक महिने बंद असल्याने उपलब्ध कागदपत्रांची खराबी झालेली असून याची दखल शासकीय पातळीवर घ्यावी. १५ दिवसात गोळवण साठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा, न पेक्षा आठवड्यातून दोन दिवस तलाठी गोळवण सजावर उपस्थित ठेवावे. अन्यथा गावातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक होऊन कोणत्याही क्षणी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असेही सरपंच सुभाष लाड यांनी निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स