मुंबईस्थित पळसंब ग्रामस्थांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेत दिले निवेदन.
प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मूळ पळसंब येथील मुंबईस्थित ग्रामस्थांनी काल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान मुंबईस्थित पळसंब ग्रामस्थांनी पळसंब गावाच्या वतीने पळसंब गावात आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र व्हावे असे लेखी निवेदन आरोग्य मंत्र्यांना दिले.
पळसंब ग्रामस्थांच्या वतीने प्रदीप परब, पदमाकर परब व हरीश सावंत इत्यादी मुंबईकर मंडळींनी हे निवेदन सादर केले.
गत वर्षीही तत्कालीन आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना याच मुद्द्यावरील निवेदन दिले गेले होते . पळसंब आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्राची मागणी आता आणखीन जोर धरु लागली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)