बिळवस येथे काथ्या प्रशिक्षण शिबीर संपन्न…!
दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाची सांगता.
महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे : माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस येथे केंद्रिय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग म॑त्रालय भारत सरकार यांच्या तर्फे काॅयर बोर्ड -कोचिन आणि नागरीक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान -सि॑धुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नारळाच्या काथ्यावर आधारित उद्योगाचे कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले.
हे शिबीर बिळवसचे माजी मुख्याध्यापक श्री सूर्यकांत ज. पालव यांच्या घरी आयोजित करण्यात आले.
हे प्रशिक्षण दोन महिन्यांच्या कालावधीचे होते . या प्रशिक्षण काळात महिलांना काथ्या पासून सु॑भ, दोरी, पायपुसणी, प्लावर पाॅट इत्यादी वस्तू शिकविण्यात आल्या. तसेच साबण तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा उपयोग करून प्रत्येक महिलेने स्वतःचा रोजगार निर्माण करून आत्मनिर्भर, आर्थिक स्वावलंबी व्हावे अशी अपेक्षा यावेळी श्री पालव सर यांनी व्यक्त केली.
सरपंच सौ मानसी पालव यांनी ग्रामपंचायत कडुन आवश्यक मदत देण्यात येईल. या करीता महिलांनी स्वतः होऊन पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. सौ अनुपमा पालव यांनी प्रशिक्षण काळात मोलाचे सहकार्य केले. यावेळी रेश्मा फणसे, सिद्धी पालव, रिया पालव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाला सेवा प्रतिष्ठान -सि॑धुदुर्ग अध्यक्ष
श्री अनिल गावडे व प्रशिक्षक सौ अनिता परब यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. सौ अमृता पालव यांनी आभार मानले. या वेळी आदर्श महिला ग्रामस॑घ बिळवस अध्यक्ष सौ रिया पालव तसेच प्रशिक्षणार्थी वीस महिला उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)