पळसंब गावात गव्या रेड्यांची दहशत...!
भात पिकाची नुकसानी..!
चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील पळसंब गावात काल रात्री गव्या रेड्यांच्या कळपाने भात पिकांची नुकसान केली. ग्रामस्थांनच्या निदर्शनास आज हि बाब आल्यानंतर त्यांनी सरपंच यांना याची खबर दिली. पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी तात्काळ ग्रामस्थांनसह याची पाहणी केली. प्रथमदर्शनी चार पाच गव्या रेड्याचा कळप असल्याचा अंदाज सरपंच गोलतकर यांनी वर्तवला या प्रकाराने पळसंब गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)