<em>ध्वज संहितेचे पालन करून 'घरोघरी तिरंगा' उत्साहात साजरा करा - के.मंजुलक्ष्मी</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. त्या निमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे. याच महोत्सवाचा भाग म्हणून आजपासून स्वराज्य महोत्सव होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत ध्वज संहितेचे पालन करून घरोघरी तिरंगा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.
घरोघरी तिरंगा उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी दररोज ध्वज खाली उतरवण्याची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कार्यालयांना ध्वज संहितेचे पालन करून ध्वज दररोज उतरवावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण भागासाठी नियोजन करण्यात आले असून नागरी भागासाठी नगर परिषद, नगर पंचायती नियोजन करत आहेत. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला त्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच प्राधिकरणासाठी ध्वज वितरण केंद्र मुख्यालय स्तरावर सुरू होत आहे, असे सांगून पोलीस बँड पथक आणि ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम कलाकारांचे कौतुक करून जिल्हाधिकारी यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)