प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे मार्गदर्शन मोलाचे : सौ. ललीन तेली.
नाबर प्रशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…!
बांदा | राकेश परब :
गुरू हे ब्रम्हदेवांप्रमाणे निर्मिती करणारे , श्री विष्णु प्रमाणे सद्गुणांचे पालन करणारे गुरु हे जिवशिवाचे परब्रम्ह रूप, ऋणातून मुक्त होण्यासाठी हा दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने आपल्या गुरुला नतमस्तक व्हायला हवे, त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवेत. आई – वडील आपले प्रथम गुरू. ‘ गु ‘ म्हणजे अंधकार नाहीसा करणारे अन् ‘रु ‘ म्हणजे ज्ञानाचा पुरवठा करणारे देवांना सुद्धा गुरु शोधावे लागले . ज्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकतो ते सर्व गुरुस्थानी गुरु माता आणि मानी श्रेष्ठ आहेत . जन्मदात्या मातेचं अजू या मातीचं ऋण फेडणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.जोपर्यंत आपल्यातील षडरिपू नष्ट होत नाहीत,तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही . म्हणूनच सन्मार्गाने चालायला शिकवणाऱ्या सद्गुरूंच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण चालायला हवे . ” अशा शब्दांत सौ.ललिन तेली यांनी विचार व्यक्त केले .नाबर प्रशालेतील गुरुपौर्णिमा कार्यक्रमा निमित्त आजोजित केलेल्या कार्यक्रमांत त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या सौ.ललिन तेली यांच्या हस्ते दिपप्रज्वनाने तसेच गुरुवर्य नाबर सर, स्वामी विवेकानंद, व्यास मुनी, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करून करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या सौ. ललीन तेली, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ . शिल्पा कोरगांवकर तसेच शिक्षिका रसिका वाटवे, हेलन राँड्रीक्स, चित्रलेखा नाईक, राँड्रिक्स उपस्थित होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा बद्दल आपले भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.रुचिता सावंत तर आभार विराज गवस याने मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)