<em>भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सामुदायिक भातशेतीचा प्रयोग….!</em>
श्री पद्धतीने २ एकर मध्ये भात शेती..!
चिंदर/विवेक परब :
मालवण तालुक्यातील हडी या गावात सुमारे दोन एकर क्षेत्रात भाजप किसान मोर्चाच्या टीम कडुन सामुदायिक भातशेतीचा प्रयोग प्रत्यक्ष लावणी करून करण्यात आला आहे.
भारत हा शेती प्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी जगला तर देशाची अर्थव्यवस्था जगु शकते. म्हणुनच भाजपा च्या किसान मोर्चा ने पडीक जमीनी कराराने घेऊन त्यावर सामुदायिक शेतीचा प्रयोग करण्याचे निश्चित करून तातडीने अंमलबजावणी केली आहे.
६४४४ नंबरचे एक काडी लावणी भात हे वाण घेऊन ही लावणी श्री पद्धतीने १० इंच × १० इंचच्या रांगेत कृषी तज्ञ, कृषी अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली.
ही सामुदायिक शेती किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेशजी सावंत , प्रगतशील शेतकरी व ओझर हायस्कूल चे चेअरमन व किसान मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर नरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली . यासाठी भाजपा किसान मोर्चा चे मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग, उपाध्यक्ष श्री. प्रसाद भोजने, सल्लागार श्री. हरिभाऊ केळुसकर, श्री. संजय मळेकर हे स्वतः ही सामुदायिक शेती गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने करत आहेत. सध्या होत चाललेला शेतीकडचा दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त लोकांनी पुन्हा शेतीकडे वळावे म्हणून मालवण तालुका किसान मोर्चा हा प्रयत्न करत आहे. शेती साठी हडी मधील गावकर कुटुंबाची दोन एकर क्षेत्र असलेली जागा निवडण्यात आली आहे.अशी माहिती किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी यावेळी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)