ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अजुनी रुसून आहे…
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अजुनी रुसून आहे…

प्रकाशन: 18 Jun 2022 04:49 PM
वाचन संख्या 44

मालवण | किरण वाळके (विशेष):
कवी ‘अनिल’ आणि लेखिका ‘कुसुमावती’ ह्यांची कॉलेजमधे असताना ओळख झाली आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. त्यांच्या तारुण्याच्या काळात उघडपणे प्रेम करणारे बहुदा हे एकमेव युगुल असेल. जात वेगळी असल्याने त्यांना खूप संघर्ष करावा लागला, पण अखेरीस १९२९साली त्यांचा प्रेमविवाह झाला व कुसुमावती त्यांच्या सहचारिणी बनल्या. खरोखरच ते दोघे made for each other होते. १९६१ साली एका कार्यक्रमाला कवी अनिल गेले होते. परत आल्यावर घराचे दार वाजवले पण काहीच प्रतिसाद आला नाही. अनिलाना वाटले नेहमी सारखी आपली प्रिया रुसून बसली आहे. रात्रभर अनिल बाहेरच थांबले. पण नंतर दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांची जीवनसंगीनी चिरनिद्रेत गेली होती. जिच्या सोबतीने आयुष्य काढण्याची शपथ घेतली होती तिचा निष्प्राण देह बघून नशिबी हे काय आलं? या विचाराने अनिल पूर्ण कोसळून गेले.

“अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना।” ही कविता कवी अनिल ह्यांनी कुसुमावतींच्या प्रेताकडे पाहून लिहली आहे. लिहली आहे असं म्हणण्यापेक्षा जगली आहे. कवितेतील कवीचा आक्रोश काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.
पण कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) ह्यांची ही कविता आहे, जी मला मनापासून आवडते.

कवी अनिल यांची पत्नीवियोगावर याहून आर्त कोणी लिहू शकेल असं वाटत नाही… किती संयमित शब्द आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. आकांडतांडव नाही. पत्नीवियोगानंतर कवी अनिल यांनी ही काळजाचा ठाव घेणारी कविता लिहीली.
…तेव्हा अनिलांच्या लेखणीतून शब्द झरझरले ……

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना

मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे

मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,

ते आज का नसावे, समजावणी पटे ना

धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,

विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?

चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,

मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,

घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?

रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।

-कवी अनिल

कवि अनिल यांची ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरांनी अमर केलीय.
ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ कुमार गंधर्व गातील असा अनिलांचा आग्रह होता आणि तसंच झालं अनिल – कुसुमावातीच हे गीत कुमार गंधर्व यांनी अजरामर केलं!

संग्रह सौजन्य (किरण वाळके,भरड मालवण)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स