ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>निगुडे पाटील वाडीतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीस..!</em>

<em>निगुडे पाटील वाडीतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीस..!</em>

प्रकाशन: 03 Jun 2022 09:01 PM
वाचन संख्या 28

स्थानिकांमध्ये खळबळ..!

बांदा | राकेश परब :
निगुडे – पाटीलवाडीतील घरांना सावंतवाडी तहसील प्रशासनाने पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाडीत एकच खळबळ उडाली आहे. नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बांधणीसाठी टाकलेल्या मातीच्या भरावामुळे पूरस्थिती येत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
निगुडे – पाटीलवाडीत सुमारे २० घरे असून सर्व घरांना स्थलांतराच्या नोटीस तलाठी भाग्यशिला शिंदे यांनी बजावल्या आहेत. ऐन पावसाच्या तोंडावरच नोटीस आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थलांतर करणे ही किरकोळ बाब नव्हे. शेती अवजारे, उपजीविकेचे वर्षभराचे साहित्य, गुरेढोरे व अन्य साहित्य घेऊन स्थलांतर करणे एवढे सोपे नाही. प्रशासनाने केवळ कागदोपत्री पद्धत पूर्ण केली. पूरस्थिती नंतर नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव घालण्यात आल्याने पाटीलवाडीत पूरस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. महामार्गापूर्वीची घरे असून पूरस्थिती निर्माण होणे ही प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाचा भाग आहे. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स