नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आजपासून मासेमारी सुरू
१ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मासेमारीला खवळलेल्या समुद्राला बसला होता लगाम
मालवण | वैभव माणगावकर :- सागरी मासेमारीला शासकीय नियमानुसार जरी १ ऑगस्टपासून अधिकृतरित्या सुरुवात झाली असली, तरी कोकण किनारपट्टीवर मात्र आज नारळीपौर्णिमेपासूनच खऱ्या अर्थाने मासेमारीचा श्रीगणेशा होणार आहे. कोळी बांधव आज पारंपरिक पद्धतीने दर्याचे पूजन करून व दर्याला नारळ अर्पण करून आपल्या मासेमारी नौका दर्यात लोटणार आहेत.
पूर्वीपासून नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर नौका मासेमारीसाठी समुद्रात जातात. मात्र, गेल्या ५ वर्षात १ ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू होते. त्याचबरोबर १ ऑगस्ट पासून पारंपरिक नौकांची मासेमारी सुरू होते. त्याचबरोबर १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते. मागील मोसमात एक ते दोन महिने नैसर्गिक कारणांमुळे मच्छिमार नौका समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाही. गेली काही वर्षे हीच अवस्था आहे. आता यंदाच्या हंगामात सागराची पूजा-अर्चा करून आणि श्रीफळ अर्पण करून नौका समुद्रात लोटली जाणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)