भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा वनभोजन उपक्रम संपन्न.
वनभोजन उपक्रमात किनारा स्वच्छतेचाही समावेश.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालय तथा ज्युनीअर काॅलेजचा वनभोजन उपक्रम प्रकल्प धुरिवाडा कुरण येथे संपन्न झाला.
गेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिण्यात आल्याने शैक्षणिक वाटचालीत काही समाजशिल सुदृढतेचे सांस्कृतिक उपक्रम टाळावे लागले होते. मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाले आहे आणि त्यामुळे शैक्षणिक उपक्रमातीलच एक चैतन्यदायी वनभोजनाचा कार्यक्रम प्रकल्प म्हणून संपन्न झाल्याचे कनिष्ठ महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.
धुरिवाडा कुरण इथल्या या कार्यक्रमात उच्च माध्यमीक विद्यालयातील मुलांनी वनभोजनातील भोजन या प्रक्रियेपूर्वी समुद्र किनारा स्वच्छता केली. नंतर गाणी भेंड्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमातही विद्यार्थी वर्ग सहभागी झाला.
स्वावलंबन,एकात्मता, व्यक्तिमत्व सक्षमीकरण,पर्यावरण, सांस्कृतीक सादरीकरण, इव्हेंट मॅनेजमेंटची , समूह व समाज जबाबदारी तोंड ओळख असे विविध स्तर विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनुभवले.
भंडारी एज्युकेशन सोसायटी उच्च माध्यमीक प्राध्यापक वर्ग ,भंडारी हायस्कूल शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आखलेल्या आणि सृजनशीलतेने राबविलेल्या या वनभोजनाच्या प्रकल्पाविषयी उच्च माध्यमीक महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.बांदेकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने माध्यमांशी संवाद साधला.
या उपक्रमाला प्राचार्य श्री. वामन खोत , प्राध्यापक श्री. पवन बांदेकर सर, प्राध्यापक श्री. अजित परुळेकर , प्राध्यापक श्री. जी. टी. दळवी , प्राध्यापक श्री. स्नेहल पराडकर , प्राध्यापक श्री. गणेश सावंत , प्राध्यापक श्री. जितेंद्र गावडे , प्राध्यापक श्री. देवेंद्र चव्हाण , प्राध्यापक वैभवी वाक्कर, प्राध्यापक अदिती शेर्लेकर यांचे योगदान व उपस्थिती होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)