ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
निदान दोन महिने तरी गावी या ; राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडची हाक…

निदान दोन महिने तरी गावी या ; राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडची हाक…

प्रकाशन: 15 Apr 2022 12:19 AM
वाचन संख्या 147

मालवण | सुयोग पंडित : राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडने कोकणातील मूळ भूमीपुत्रासांठी शेती,जमिन व एकंदर सांस्कृतिक रक्षणाचे आवाहन केले आहे.
राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे 16 आणि 17 एप्रिलला भव्य शेतकरी सभासद मेळावा व अपारंपारिक शेती मार्गदर्शन असे उपक्रम राबविण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर सदर जागरुतीचे आवाहन केले गेले जात आहे.

कोकणातील लोकांनी मुंबईत येऊन प्रगती केली, सर्व उत्सव, क्रीडा,नाटक, सांस्कृतिक पंरपरा आजही मुंबईत टिकून ठेवली आहे पण या जागतिक स्पर्धा मध्ये ही पंरपरा आता लोप पावत आहे, गावाकडे पण आता भजन, भारुड, लोककला, नाटक ही सर्व कला कोकणातील जनतेने महाराष्ट्रला दिली, मुंबईत दिली पण पुढे अति शिक्षित युवकांनी ही पंरपरा सोडून फक्त पैसे कमवायचे ठरवून इकडे दुर्लक्ष केले आहे.

गावाकडे २५ वर्ष अगोदर गाव खेडी नटलेली होती. सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळें, फुले गावा गावात होती. कोकणात निसर्गाने सुंदर परीसर दिलेला आहे. लोक समाधानी, शुध्द जेवण व शुध्द हवा, सुंदर आरोग्य घेऊन जगत होती मात्र शिक्षण घेऊन जागतिक स्पर्धा मध्ये पैसे कमवायचेच आहेत हाच ध्यास घेऊन प्रत्येक ग्रामीण गावातील तरुण सर्व काही सोडून मुंबईत स्थलांतरित झाले व कोकणातील गाव वाड्या आता ओसाड होतआहेत . ज्यांची आता ४० ते ५० वर्ष झालेल्या वयाची माणसे आहेत ही माणसे गावाकडे जात येत असतात, गावाचा मंडळ चालवतात, गावाकडे घर सुधारणा करून गावाकडे विकास करीता धडपड करतात पण मागील १० वर्षात युवा पीढ़ी मात्र गावाकडे फक्त गणपती ,शिमगा व मे महिन्यात मौजमजा करण्यासाठी येतात या पलीकडे काही नवीन करण्याचा विचार करीत नाही. पावसाळ्यात तर येतच नाहीत. आई बाबांची शेती व गावचा विकास यावर काही संशोधन करण्यासाठी तयार नाहीत म्हणून गावाकडे प्रगती थांबली आहे. किमान पावसाळ्यात तरी लक्ष दिले पाहिजे.

५०किमी. ताशी चालणारी वाहने आता १२० किमी च्या गतीने धावत आहेत, रस्ते सिंमेट काॅन्क्रिटचे तयार होत आहेत. गावाकडे जाण्यासाठी विविध पर्याय आहेत आता २५ ते ४० वयोगटातील युवकांनी गावाकडे आधुनिक , सामुदायिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गावाकडे हिरवे गार शेती करण्यासाठी प्रशिक्षण घेऊन प्रयोग केले पाहिजेत, शेती मध्ये गुंतवणूक केली तरच गावाकडे विकास होईल नाहीतर गावाकडे रस्ता पाहीजे, पाणी पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, एसटी पाहिजे पण गावाकडे माणसे राहिली नाहीतर हा विकास काय कामाचा, अशा उदासीनता मुळे कोकण भकास होईल. म्हणून मित्रांनो गावाकडे चला महीन्यातून दोन दिवस जा, संशोधन करा, प्रकल्प तयार करा व गाव वाड्या विकसित करा. निसर्गाच्या सानिध्यात या, शुध्द हवा, ताजेतवाने होऊन ताजे अन्न खा, निरोगी रहा या करीता कोकणातील गावाकडे लक्ष दया. मुंबईत शहरात रहा, पण गावाकडे किमान लक्ष द्या, गाव तुमची जन्मभूमी आहे , तर मुंबई तुमची कर्मभूमी आहे हे लक्षात ठेऊन कोकणातील गावाकडे जाऊन विकास सुरू करुया अशी आवाहनात्मक हाक राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे कोकणवासियांना देण्यात आली आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स