भाजपा शिष्टमंडळाने चर्चेसाठी मागितली मुख्याधिकार्यांची वेळ..!
चिंदर | विवेक परब : वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये प्रशासक लागल्यापासून गेल्या तीन महिन्यात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर दुर्लक्ष झालेला दिसत आहे असा आरोप करत वेंगुर्ले शहर पुन्हा अधोगतीला जात असल्याचे वेंगुर्ले भाजपातर्फे सांगण्यात आले आहे.
तसेच शहरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोट्यावधी रुपये खर्चून केलेली विकासकामे मेंटेनंस अभावी धुळखात पडली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपा शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची वेळ मिळावी म्हणून लिखीत स्वरुपात मागणी केली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर व प्रणव वायंगणकर, मा.नगरसेवक प्रशांत आपटे – नागेश उर्फ पींटू गावडे – धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर – साक्षी पेडणेकर – ईशा मोंडकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, व्यापारी संघाचे अशोक ठोंबरे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, महिला मोर्चाच्या आकांक्षा परब – वृंदा मोर्डेकर – रसीका मठकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , बुथप्रमुख शेखर काणेकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)