भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांची नियुक्ती.
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांची नियुक्ती.
सर्व आरोपींविरुद्ध भारतातील सर्वात कठोर दहशतवादविरोधी कायदा.
मुंबई | ब्यूरो न्यूज : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशात गाजलेले अत्यंत संवेदनशील आणि पूर्वनियोजित हत्याकांड मानले जाते. या हत्येचे मुख्य आणि एकमेव कारण होते ते म्हणजे भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी २०२२ मध्ये एका टीव्ही वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेले आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य होय. त्यामुळे देशभरातून अनेक कट्टरपंथी मुस्लिम संघटनांकडून त्याचा विरोध करण्यात आला होता. या वक्तव्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः आखाती देशांमध्ये उमटले. अनेक मुस्लिमबहुल देशांनी यावर आक्षेप नोंदवत विरोध दर्शवला होता.
२१ जून २०२२ रोजी अमरावतीत ५४ वर्षीय औषध विक्रेते (केमिस्ट) उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची समाज माध्यमांवरील एका पोस्टच्या वादातून म्हणजे जून २०२२ रोजी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ तिच्या फोटोसह एक संदेश शेअर केला होता. त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
देशातील सर्वोच्च यंत्रणा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने याचा तपास केला असून एकूण ११ आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींविरुद्ध भारतातील सर्वात कठोर दहशतवादविरोधी कायदा म्हणजे "बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा १९६७ " (Unlawful Activities Prevention Act 1967) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून मुंबई विशेष सत्र न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (NIA) म्हणण्यानुसार, ही हत्या पूर्वनियोजित होती आणि देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हेतू होता. तसेच "गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा" एनआयएने आपल्या आरोपपत्रात या घोषणेचाही उल्लेख केला आहे. याच प्रेरणेतून या ११ जणांनी फार्मसिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप आहे..
सदरच्या प्रकरणात आता पीडित कुटुंबाच्या वतीने न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी ऍड. श्रीराम चिंदरकर व सहकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून पीडित कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा व सर्व कट्टरपंथी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण न्यायालयात त्यांची बाजू मांडणार असल्याचे ऍड. श्रीराम चिंदरकर यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...