ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
अधिकाऱ्यांच्या संगनमताने ५ ते ६ वर्षांपासून वृक्षतोड झाल्याचा निळेली ग्रामस्थांचा आरोप...!

अधिकाऱ्यांच्या संगनमताने ५ ते ६ वर्षांपासून वृक्षतोड झाल्याचा निळेली ग्रामस्थांचा आरोप...!

अधिकाऱ्यांच्या संगनमताने ५ ते ६ वर्षांपासून वृक्षतोड झाल्याचा निळेली ग्रामस्थांचा आरोप...!

Article image


निळेली प्रक्षेत्रामधिल वृक्षतोडीच्या परवानग्यांबाबत देखिल प्रश्न.

Article image


कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पशु पैदास केंद्र, निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून साग, खैर, कीनळ, आकेशिया आदी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तोड झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वृक्षतोडीसाठी मात्र संबंधित आवश्यक त्या परवानग्या वनविभागाकडून घेण्यात आल्या होत्या का, याबाबतही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

   

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही वृक्षतोड पशु पैदास केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे‌‌. या प्रकाराबाबत चौकशीची तक्रारही करण्यात आली होती परंतु त्याकडे बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही संबंधित यंत्रणा आणि वनविभागाने काहीच कारवाई केली नसल्याचे दिसत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 


या प्रकरणाची संपूर्ण निष्पक्ष चौकशी करून वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान वसूल करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स