ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आम्हाला १५ ऑगस्ट आणि बाकिच्यांना ३० जुलै....?
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आम्हाला १५ ऑगस्ट आणि बाकिच्यांना ३० जुलै....?

आम्हाला १५ ऑगस्ट आणि बाकिच्यांना ३० जुलै....?

Article image


तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे मासेमारी बंदीच्या मुदतीबद्दल शासनाला विविध सवाल.


मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख तसेच अनुभवी मच्छिमार आणि मच्छिमार नेते हरी खोबरेकर यांनी मासेमारी बंदीच्या मुदतीबाबत शासनाला विविध मुद्द्यांद्वारे सवाल केले आहेत.


महाराष्ट्र राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला तरी शेजारील राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैला संपत आहे. बंदिच्या वाढीव कालावधीत शेजारच्या राज्यांतील ट्रॉलर्सधारक महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसून मासळीची लूट करण्याची शक्यता आहे असे हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, परराज्यातील ट्रॉलर्सना रोखण्यासाठी आणि मच्छिमारांचे नुकसान टाळण्यासाठी 'शासन पायबंद घालणार' असा सवाल तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे.


काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंतच होता. मात्र, शेजारील राज्यांशी सुसंगतता राखण्यासाठी आणि स्थानिक मच्छिमारांचे नुकसान टाळण्यासाठी हा कालावधी नंतर ३० जुलैपर्यंत करण्यात आला होता. आता शासनाने पुन्हा नव्याने हा बंदी कालावधी वाढवून तो १५ ऑगस्ट केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मच्छिमारांच्या नौका बंदरावर उभ्या राहतील, पण दुसरीकडे लगतच्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमधील मासेमारी बंदी ३० जुलैलाच संपणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासूनच या राज्यांतील शेकडो ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासळीची लूट करण्यासाठी सज्ज होतील, अशी भीती खोबरेकर यांनी व्यक्त केली आहे.


जर महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी आणि येथील हक्काची मासळी लगतच्या अन्य राज्यांतील ट्रॉलर्सना एकप्रकारे आंदणच दिली जाणार असेल, तर 'या निर्णयाचा फायदा काय,' असा हरी खोबरेकर यांचा सवाल असून, आपल्या राज्यातील मच्छिमारांचे हित राखण्यासाठी, लगतच्या राज्यांमध्येही मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री 'केंद्रीय पातळीवर किंवा संबंधित राज्यांशी,' चर्चा करून प्रयत्न करणार आहेत का असा प्रश्न देखिल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.


वाढीव १५ दिवसांच्या काळात परराज्यातील यांत्रिक नौका आणि हायस्पीड ट्रॉलर्सना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी 'मत्स्यव्यवसाय विभाग आणि सागरी पोलीस काय कडक पावले उचलणार', याकडे आता संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमारांचे लक्ष लागले आहे. शासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना जाहीर करावी, अशी मागणी हरी खोबरेकर यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स