वायरी तेली पाणंद ग्रामस्थांची आमदार निलेश राणे यांच्याशी भेट.
बंधाऱ्याचे लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांना केले आश्वस्त.
मालवण | ब्यूरो न्यूज : सागरी अतिक्रमण बाधित वायरी तेली पाणंद समुद्रकिनारी परिसरालगत असलेल्या ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. दरम्यान, याठिकाणी सागरी बंधारा उभारणी करून संरक्षण मिळवून देणे बाबत प्रस्ताव ऑगस्ट २०२४ मध्ये आपल्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. मंजूर बंधाऱ्याचे भूमिपूजन लवकरच होईल, असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

बंधारा नसलेल्या भागात लाटांच्या तडाख्यात नुकसान होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या भागाची पाहणी करत आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती. आमदार राणे यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी मालवण दौऱ्यात ग्रामस्थांची भेट घेत त्यांना आश्वासित केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळुस्कर, वायरी भूतनाथ विभाग प्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, सूरज बिरमोळे, कान्हा माडये, विनय मातोंडकर, क्रांती माडये, साईनाथ माडये, सुजाता मातोंडकर, अनुराधा पाटकर, प्राजक्ता पाटकर, उदय पाटकर, किरण वालावलकर, कृपाल वालावलकर, चेतन मांजरेकर, वल्लभ पाटकर, गुरु तळवडेकर, प्रसाद डिचोलकर, संदेश तळगावकर, गुरु पाटणकर, दादा वेंगुर्लेकर, सुदेश मयेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)